चैत्रपालवी संगीतोत्सव

अक्षयतृतीया हा चतुरंगचा वर्धापनदिन. प्रतिवर्षी तो फक्त कार्यकर्त्यांमधेच साजरा केला जात असे. या वर्धापनदिनाच्या निमित्ताने रसिकांनाही प्रतिवर्षी उत्तम कार्यक्रम द्यावा या विचारातून जन्म झाला तो चैत्रपालवी संगीतोत्सवाचा ! मधल्या काही वर्षांपूर्वी पाश्चात्य संगीताचा तरूणांच्या मनावरील पगडा अधिक ठळक होत असून अभिजात भारतीय संगीताच्या परंपरेला तुलनेने दूर ठेवले जात असल्याचे चित्र समाजात निर्माण झाले होते. या पार्श्वभूमिवर अभिजात भारतीय संगीत परंपरेची जोपासना करू पाहणाऱ्या, गुरूकडून त्याचे रीतसर शिक्षण घेणाऱ्या उदयोन्मुख युवा कलाकारांना जाणकार श्रोत्यांचे एक व्यासपीठ निर्माण करून देता आले. यात नवोदित कलाकारांना रसिकांची मिळणारी दाद आणि संगीत रसिकांना पुढच्या पिढीची संगीत क्षेत्रातील प्रगती या गोष्टी परस्पर पूरकतेने प्राप्त होत होत्या. सोबत बजुर्ग कलाकाराचे सादरीकरण हाही या संगीतोत्सवाचा प्रतिवर्षीचा एक ठळक विशेष ठरत आला आहे.