अक्षयतृतीया हा चतुरंगचा वर्धापनदिन ! दि. २४ एप्रिल १९७४ च्या अक्षयतृतीयेला सायंकाळी शिवाजीपार्कच्या उद्यान गणेश मंदिरात समविचाराचे चार तरुण एकत्र आले आणि चतुरंग संस्थेने जन्म घेतला. पुढच्या काही वर्षांच्या काळात चारांचे चौदा ,चाळीस आणि एकशेचाळीस होत गेले . चतुरंगने हाती घेतलेल्या उपक्रमांचा वेग आणि व्याप्ती वाढतच राहिली. मात्र प्रतिवर्षीचा हा चतुरंग वर्धापनदिन मुंबई आणि डोंबिवलीतील चतुरंग कार्यकर्त्यांकडून अत्यंत साधेपणाने साजरा होत राहिला आहे. अक्षयतृतीयेच्या दिवशी सकाळी सात-साडेसातच्या सुमारास उद्यान गणेश मंदिरी सर्वांनी एकत्र भेटणे,परस्परांशी थोड्या गप्पागोष्टी , श्री गणेशाचे सामुहिक दर्शन , अथर्वशीर्ष पठण,आरती ,प्रसाद पेढा आणि नंतर पियुषपान असे इतके साधे या वाढदिवसाचे स्वरूप असते. या दिवशी चतुरंग चिपळूण मधील मंडळी श्री वीरेश्वर मंदिरात दर्शन-प्रार्थनेसाठी जातात .
आगामी कार्यक्रम
सध्या उपलब्ध नाहीत.
अहवाल
गुणवंत गौरव सोहळा
चतुरंग रंगसंमेलन
चतुरंग वर्धापनदिन
चैत्रपालवी संगीतोत्सव
दिवाळी पहाट
निवासी वर्ग निकाल
पालक मेळावा
पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ
मुक्तसंध्या
विशेष उपक्रम
शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग
श्रवणानंद
सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार
सवाई एकांकिका
सवाई एकांकिकोत्सव
स्वातंत्र्याचे पूर्वरंग
प्रशस्तिपत्रे

समान विचारांच्या मित्रांनी ,समान उद्दिष्टासाठी ,समान पातळीवर राहून चालविलेलं हे कार्य आहे . ही कार्यपध्दतीने मला इतरत्र कुठे दिसली नाही . त्यामुळेच मला या संस्थेसंबंधी कुतूहल आणि आदर वाटतो.

समान विचारांच्या मित्रांनी ,समान उद्दिष्टासाठी ,समान पातळीवर राहून चालविलेलं हे कार्य आहे . ही कार्यपध्दतीने मला इतरत्र कुठे दिसली नाही . त्यामुळेच मला या संस्थेसंबंधी कुतूहल आणि आदर वाटतो.